Logo

पुनश्च हरिः ॐ !

- 07/04/2022   Thursday   8:30 am
पुनश्च हरिः ॐ !

बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर पक्षीकाच्या पहिल्या अंकातील पहिला लेख

प्रस्तुतच्या लेखकानें  पासून ' मूकनायक " या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्र चालू केले होते . सदरील वृत्तपत्रासंबंधी आपले मनोगत व्यक्त करिताना , त्याने पहिल्या अंकांत असे म्हटलें होते की , “ आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रा सारखी अन्य भूमीच नाही . परंतु मुंबई इलाख्यांत निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असतां असे दिसून येईल की , त्यांतील बरीचशी पत्रे विशिष्ठ अशा जातीचे हितसंबंध पहाणारी आहेत . इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते . इतकेच नव्हें तर केव्हां केव्हां त्यांना अहितकारक असेंहि त्यांतून प्रलाप निघतात . अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इषारा आहे की कोणतीहि एखादी जात अवनत झाली , तर तिच्या अवनतींचा चट्टा इतर जातींस बसल्या शिवाय राहाणार नाही . समाज ही एक नौकाच आहे . व ज्याप्रमाणे आगबोटींत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गम्मत पाहा ण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा , जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाहि आधी किंवा मागाहून जलसमाधि ही घ्यावीच लागणार आहे . त्याच प्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने , प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार , यांत बिलकूल शंका नाही . म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये . हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणा वयाचे . दीनमित्र , जागरूक , डेक्कनरयत , विजयी मराठा , ज्ञानप्रकाश , इंदुप्रकाश व सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चचा वारंवार होते . परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो , त्यांत बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोहहोण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही हेहि पण उघड आहे . अशा या अति बिकट स्थितिशी संलग्न असलेल्या प्रश्नांची उकल करण्यास एक स्वतंत्रच पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील . ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे . खास अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करण्यासाठी " सोमवंशीय मित्र " , " हिंद नागरीक , " " विटाळ विध्वंसक " , ही पत्रे उपजली व लयही पावली . परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास “ मूकनायक " न डगमगता स्वजनोद्धाराचे मह कार्य करणारांस योग्य पंथ दाखविल , असे आश्वासन देताना तें अनुभवाअंति खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वाशयनिवेदन आटोपते घेतो . " प्रस्तुतच्या लेखकाने या उताऱ्यात जाहीर केलेला हा संकल्प फार दिवस टिकला नाही याबद्दल त्यास खेद वाटतो . पण हा संकल्प सिद्धीस गेला नाहीं यांत त्याचा दोष नाही , हे ज्यांस खरी परिस्थिति ठाऊक आहे त्यांस अवगत आहेच . पत्राचा उपक्रम सुरूं केल्यानंतर प्रस्तुतच्या लेखकास असे दिसून आले की , अशा प्रकारचा लोकसेवेचा मार्ग पत्करणे झाले तर त्याकरिता कोणता तरी एखादा स्वतंत्र धंदा हस्तगत करणे अवश्य आहे . त्यास अनुसरून सुसाध्य अस . ब्यारिस्टरी सारखा स्वतंत्र धंदा करता यावा म्हणून आपला अवशेष राहिलेला अभ्यासक्रम पुरा करण्या साठी त्यास परत विलायतेस जाणे भाग पडले . जाताना त्याने वृत्तपत्राच्या कार्याची सूत्रे काही दिवस त्याच्या तालमीत राहिलेल्या एका तरुणाच्या हाती दिली . प्रस्तु तच्या लेखकास आशा होती की , अभ्यासक्रम संपवून परत आल्यावर सदरील वृत्तपत्र भरभराटीस आलेलें आपल्या दृष्टीस पडेल . पण त्याच्या कमनशीबाने ती आशा व्यर्थ ठरली . कारण परत येण्यास निघण्यापूर्वीच पत्राला मूठमाती मिळाल्याची बातमी त्यास कळली . अंगीकृत कार्याचा अशा रीतीने अल्प काळांतच नाश झालेला पाहून ज्याचे त्यास वाईट वाटणे साहजिकच आहे . ह्या नाशांची कारणे जनतेपुढे मांडून त्यांच्या खरेखोटेपणाची छाननी करीत बसण्यांत प्रस्तुतच्या लेखकास काही अर्थ दिसत नाही . परंतु आज जवळ जवळ सहा वर्षांच्या कर्मलोपानंतर जुन्या स्वाध्यायास नव्या नावाखाली पुन्हा सुरवात प्रस्तुतचा लेखक कां करीत आहे , यासंबंधी खुलासा केल्यास वावगे होणार नाही असे वाटते . सहा वर्षांपूर्वी प्रस्तुतच्या लेखकानें “ मूकनायक " पत्रास सुरवात केली तेव्हां राजकीय सुधारणेचा कायदा अमलात यावयाचा होता . त्यास ' अनुसरून वृत्तपत्राची जरूरी काय आहे याचे दिग्दर्शन करताना प्रस्तुतच्या लेखकाने असे म्हटले होते की " जर या हिंदुस्थान देशांतील सृष्ट पदार्थांच्या व मानव जातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले , तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे असें निःसंशय दिसेल . 

" हिंदु धर्मीयांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निदास्पदही आहे . कारण विषमतेनुरूप होणाऱ्या परस्परांच्या व्यवहाराचे स्वरूप हिंदुधर्माच्या शीलाला शोभण्यासारखें खास नाही . हिंदुधर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्चनीचभावनेने प्रेरित झाल्या आहेत हे उघड आहे , हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय . पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोऱ्यास शिडी नाही ; आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही . ज्या मजल्यांत ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यांत त्यांनी मरावे . खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीहि नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही . उघड भाषेत बोलावयाचे म्हणजे जाती जातीत असलेल्या या उच्चनीच भावना गुणावगुणांच्या पायावर शाल्या आहेत असे नाही . उच्च जातीत जन्मलेला मग तो कितीहि अवगुणी असो तो उच्च म्हणावयाचा ; तसेच नीच जातीत जन्मलेला मग तो कितीहि गुणी असो , तो नीचच रहावयाचा . दुसरे असे की , परस्परांत रोटी - बेटी व्यवहार होत नसल्यामुळे दर एक जात या जिव्हाळयाच्या संबंधांत स्वयंवह म्हणजे तुटक आहे . ही निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्यव्यव हार अनियंत्रित असा नाही . काहींचा व्यवहार दारा पर्यंतच होतो व काही जाती तर अस्पृश्य आहेत , म्हणजे त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असतां इतर जातीतील माणसास विटाळ होतो . विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातीच्या लोकांशी क्वचि तच व्यवहार होतो . रोटी - बेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणांत स्पृश्यास्पृश्य भावनेने इतकी भर टाकली आहे की , या जाती हिंदू समाजात असून समाजाबाहेर आहेत असेंच म्हटले पाहिजे . या व्यवस्थेमुळे हिंदुधर्मीयांचे ब्राह्मण , ब्राह्मणेतर व बहि कृत असे तीन वर्ग होतात . तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की , तिच्या पायी विविध जातीवर विविध परिणाम झाले आहेत . सर्वांत उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गास आपण भू - देव आहों असें वाटत आहे . सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भू - देवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे , आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने इतरांपासून आपली सेवा करून घेऊन आपण राजरोसपणे व बिनदिक्कत मेवा खात आहेत . त्यांनी काही करणी केली आहे म्हणावें तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्रलेखन एवढेच काय ते ! पण तें धर्मशास्त्र म्हणजे उदात्त विचार व नीच आचार यांतील प्रबल विरोधाचे कोडेच म्हणावयाचें . सचेतन व तसेच अचेतन वस्तु ही सारी ईश्वराची रूपे आहेत , असें उपदेशणाऱ्या तत्ववादीयांच्या विचारांत व आचा रांत विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असणारांचे लक्षण नव्हे . वेडेवाकडे कसेहि असो पण या धर्मशास्त्राची छाप लोकांवर काही कमी नाही . आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण नाकबूल करील ? विधा तक धर्मभावनेच्या शृंखलेने जखडून घेऊन शत्रूस मित्र समजून त्यांच्यापायी इतर जन लीन का झाले याचा उलगडा करण्यास फार दूर जावयास नको . अज्ञानी लोकांकडून काहीहि करविता येईल आणि म्हणूनच ज्ञानसंचय - प्रसार नव्हे - ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माच मोठे तत्व बनवून ठेवण्यात आले आहे . " सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नति खुंटली , हे निर्विवाद आहे , परंतु त्यांच्या दुःखात दारिद्रयाची तरी भर पडली नाही . कारण शेती , व्यापार , उदीम अथवा नोकरी करून आपला चरितार्थ चालविणे त्यांना दुरापास्त नाही ; पण या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे . दौर्बल्य , दारिद्रय व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहवत आहे हे । खास . दीर्घकाल अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचीत आहे . आहे ती स्थिति योग्य आहे यापेक्षा बरी स्थिति आपल्या नशिबी । अंजनहि आजकाल नाही अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजनच नाही . पण ते मिरची मसाल्याप्रमाणे विकत ध्यावे लागत आहे ; आणि दाखियामुळे ते दुर्मिळ झाले तहि नाही , कारण ज्ञानमंदिरात सर्वच ठिकाणी भआहे . कोठे कोठे तर विकत घेऊ गेलों असतां ते मिळ अस्पृश्यांचा प्रवेश होतो असें नाही . दारिद्रयाची बोळ वण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळविण्यास हवी तेवढी संधि किंवा मोकळीक नाही . नोकरी , व्यापार , उदीम इत्यादि धंद्यात त्यांना क्वचितच रिघाव होतो ; नशीब काढण्यास कोठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे . " प्रचलित हिंदू धर्माच्या अति घोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधि अविवेकी व दुराग्रही जन जोपर्यंत या देशांत वावरत आहेत तोपर्यंत आपला समाज निकृष्ट स्थितीमध्येच खितपत रहाणार आहे , याची जाणीव या बहिष्कृत समाजातील बऱ्याच लोकांस झाली आहे , असे म्हण ण्यास प्रत्यवाय नाही . तसेंच परस्थ सरकारास आपल्या तंत्राने वागावे लागत आहे याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितिविषयी वरिष्ठ हिंदकडून त्याचा कसा गैरसमज करुन देण्यात येत आहे हे देखील त्यांना कळून चुकले आहे . जातिभेद व जातिमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या या देशांत खरे स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधीतर्फे राज कीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणा बद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे . एवंच राज कीय सत्ता मिळवून तिच्या जोरावर सामाजिक विषम तेचे दडपण कायम करू पाहाणारांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे , ही त्यांच्यांत उपजलेल्या जागृतीची साक्ष होय . " सुधारणेचा कायदा अमलात येण्यापूर्वीचे हे उद्गार आहेत . आता सुधारणेचा कायदा अमलांत आलेला आहे . इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमा णांत वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे . बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधींच्या बाबतीत मुळी दाद न लावता ज्याप्रमाणे त्याचा एखाद्या जनावराला निर्दय धनी कसायाच्या स्वाधीन करतो त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या माबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे . सहा वर्षा पूर्वीची स्थिति व आजची स्थिति यांची तुलना जर केली तर अस्पृश्यांची स्थिति सहा वर्षापूर्वीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे यांत वानवा नाही . ही शोचनीय स्थिति जगजाहीर करुन होत असलेली हेळसांड टाळावयाची असेल व घडत असलेल्या अन्यायापासून व जुलमापासून बचाव करावयाचा असेल . तर वृत्त पत्राची जरुरी सहा वर्षांपेक्षा आज अधीक तीव्र आहे है बहिष्कृत वर्गातील सर्व जाणत्या माणसांस लागेल . शिवाय १ ९ ३० साली हिंदुस्थानच्या कायद्याची दुरुस्ती होऊन १ ९ ३० साली इंग्रजांनी आपल्या हाती राखून ठेवलेली सत्ता देखील हिंदी लोकांच्या हाती देण्यात येईल असा अंदाज आहे . तसे जर झाले व त्याबरोबर बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रति निधी मिळाले नाहीत तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच समजावे . कारण ब्रिटीश सरकारचे निःपक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठेवले जाईल इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही . हा घोर प्रसंग जर टाळावयाचा असेल तर आतापासूनच चळवळीस सुरवात केली पाहिजे असें प्रस्तुतच्या लेखकाचे ठाम मत झाले आहे आणि ह्मणूनच त्याने आपल्या स्वाध्यायास पुन्हा प्रारंभ केला आहे . ईश्वर करो आणि या कार्यात यशप्राप्ती होवो .
राहिले . माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो . परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना पाटाचा पायथा सोडून घाटमाथ्यावर माझे आज पर्यंतचे जीवीत गेले . आज २५ वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे . जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने श्रृंगारला आहे त्या प्रदेशांत पाऊल टाकल्याने कोणालाहि आनंदच वाटणार आहे . ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळयाचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही . परंतु आजच्या प्रसंगी मला जितका आनंद होतो तितकाच खेदही होतो असें हटल्याशिवाय माझ्याने राहवत नाही . एकदा स्थिति अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे ह्मणण्यास काहीच हरकत नाही . एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळीने हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता . त्याचप्रमाणे पांढरपेशे लोक खेरीज करुन बाकीच्या वर्गाच्या तुलनेने पाहतां अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता . ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करीपेशा हें एक महत्वाचे कारण होते . ब्रिटीश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांस नशीब काढण्यास किती वाव होता , या बद्दल आज काही नक्की सांगता येत नाही . परंतु त्याकाळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालतांना स्पृश्यावर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे , थुकीने रस्ता विटाळेल म्हणून गळयांत गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे . त्याकाळी वाव असला तरी अगदीच थोडा असला पाहिजे . इंग्रजी लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हां कोठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांना डोके वर काढण्यास संधी मिळाली . त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे , किती तेज आहे व त्यांची बुद्धीमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले . याचा पुरावा जर पाहिजे असेल तर जुनी आमिलिस्टाची बा . चाळून पाहिली म्हणजे बस्स होईल . या प्रांतातील अस्पृश्य वर्गात किती सुभेदार झाले , किती जमादार झाले , किती हवालदार झाले , नार्मल स्कूल सारख्या शाळांतून पास होऊन किती हेडमास्तरांच्या हुद्यावर चढले , एजुटंट क्लार्क व क्वार्टर मास्तर क्लार्क सारख्या जबाबदारीच्या जागा कितीकांनी चालवून दाखविल्या , याचा तपशील जर देऊं गेलों तर हे भाषण मर्यादेचे बाहेर वाढेल . इतके सांगितले म्हणजे पुरे आहे की , एकेकाळी जो अस्पृश्य वर्ग सेवक म्हणून नांदत होता तोच वर्ग पलटणीतील नोकरीमुळे अधि कार संपन्न होऊन दुसन्यावर्गावर सत्ता गाजविता झाला होता . या पलटणीतील नोकरीमुळे हिंदुसमाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती , असे म्हणण्यास काहीच हरकत नाही . ज्या महार , चांभार लोकांना गावांत मराठे वगैरे लोक शीवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजत तेच मराठा शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करुन बघण्याची त्यांची ताकद होत नसे . एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकांस या देशातील कोणत्याहि प्रांतांत व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता . " 

-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
-रविवार ता.३एप्रिल १९२७.
डॉ बाबासाहेबांच्या स्वतंत्र निर्भीड निष्पक्ष पत्रकारितेस त्रिवार वंदन मनाचा जय भीम

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: